यश म्हणजे काय? या प्रश्नाचा वेध घेण्याचा एका वेगळ्या प्रकारचा प्रयत्न शिल्पा खेर यांनी या पुस्तकात केलेला आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिथयश मंडळींच्या मुलांनी घेतलेल्या मुलाखती व त्या अनुषंगाने त्यांची आपसातील चर्चा, अशा स्वरुपात या प्रश्नाच्या उत्तराची उकल तरुण मंडळींपुढे मांडण्याचे काम मोठ्या समर्थपणे त्यांनी केले आहे.
केवळ पैसा आणि प्रसिद्धी पुरत्या यशाच्या कल्पना मर्यादित न ठेवता त्या पलीकडेही खूप मोठे दालन उघडे असल्याचे मान्यवरांच्या अनुभव व कर्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या वस्तुनिष्ठपणे मांडले आहे.प्रगल्भ विचार करण्याची क्षमता असलेल्या पण आजच्या भौतिकयुगाचा पगडा असलेल्या आजच्या तरुण वर्गाला हे विवेचन नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करेल अशी आशा वाटते.